मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी राम शिंदे बोलत असतांना त्यांनी रोहित पवार यांचावर खोचक टीका केली आहे. `बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राम शिंदे यांनी केली.
राम शिंदे पुढे म्हणाले, निवडणुकीत बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र, एक वर्षानंतरही कर्जत काहीच विकास झाला नाही ’ त्यामुळे बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित यांनी माजीमंत्री राम शिंदे यांचापराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली होती.