सरसंघचालक मोहन भागवत यांची टीका
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी मॉब लिचींगच्या घटना घडत आहेत त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरच आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मॉब लिचींगच्या नावाखाली समाजात विशीष्ट गट दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच हिंदु संस्कृतीस बदनाम करण्याचे काम देखील करण्यात येत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय सामाजिक सद्धभाव समितीकडून आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
समाजात गोरक्षा किंवा हिंदु धर्माच्या नावाखाली मॉब लिचींगसारख्या घटना घडत आहेत. यासाठी एक विशिष्ट वर्ग कारणीभूत असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले. तसेच देशात गोरक्षेच्या नावाखाली सामुहिक मारहाणीच्या घटना घडत आहेत. तसेच काही राज्यात धर्म परिवर्तनाची चळवळच सुरू करण्यात आली आहे. देशात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचेही भागवत यांनी यावेळी म्हटले.