चेन्नई – तमिळनाडूतील नागरिकांना घराजवळच जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी राज्य सरकारने राज्यात 3 हजार फिरती रेशन दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून 5 लाख 37 हजार रेशन ग्राहकांना लाभ होणार आहे.
अम्मा मोबाइल फेअर प्राईस शॉप या नावाने ही स्कीम सुरू होत आहे. सध्या राज्यातील निलगिरी, नमक्कल आणि सालेम या ठिकाणच्या दुर्गम भागात अशी 48 फिरती रेशन दुकाने कार्यरत आहेत. हीच योजना राज्याच्या अन्य भागातही सुरू होत आहे.
दुर्गम भागातील फिरती रेशन दुकाने जयललिता यांनीच सन 2014 मध्ये सुरू केली होती, त्याची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे. या उपक्रमासाठी सुरुवातीच्या टप्प्यात दहा कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
आज त्यातील पहिल्या सात फिरत्या रेशन दुकानांना मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घाटन केले.