मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. सभेपूर्वी शिवाजी पार्कवरील वातावरण भगवे झाले आहे.
सगळे भोंगे अद्याप उतरले नाहीत, दहा टक्के बाकी आहेत, आज राज ठाकरे यावर बोलतील असा सूतोवाच प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. राज ठाकरे विचार आणि वारसा दोन्हींचे खरे वारसदार असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.
जमायला सुरवात झाली आहे.
अवघ्या काही तासात सुरू होणाऱ्या सभेसाठी कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी देखील गर्दी करायला सुरुवात केली आहे. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. त्यावरही ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
या मुद्द्यांवर काय बोलणार राज ठाकरे
शिंदे ठाकरे गटातील सत्तासंघर्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी निवडणूक
मनसेची आगामी वाटचाल आणि युती
राज्यात सुरु असलेले विविध क्षेत्रातील मोर्चे आणि शेतकरी
सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
सध्याचे शिंदे फडणवीस सरकार