कोलकाता: लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारल्यानंतर ममता बॅनर्जी अनके मुद्यांवरून चर्चेत येत आहेत. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला पाहिजे, असा नारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दिला होता. तोच नारा आता मामता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये दिला आहे. बंगालमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ‘बांग्ला’ आलंच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्रमक रूप गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
“मी ज्या राज्यात जाते तेव्हा तिथली भाषा बोलते. बंगलामध्ये राहणाऱ्यांना ‘बांग्ला’ यायलाच हवी. राज्यात कायदा आणि सुवव्यस्थेची स्थिती कुणालाही बिघडवता येणार नाही. देशभरातून अनेक समाजकंटक कोलकात्यात येतात आणि फिरतात हे मी चालू देणार नाही”