मुंबई – भाजपच्या गोटात सामील होत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून घेतली. अजित पवारांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना फसवून तिथे नेण्यात आले असल्याचे आमदारांनी पवारांना सांगितले. अजित पवार यांनी उपस्थितीसाठी आमदारांकडून सह्या घेतल्या होत्या. परंतु शपथ घेण्याच्या आधारे त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी अजित पवारांवर केला आहे.
तसेच सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार देखील नवाब मालिकांनी यावेळी केला.
‘भगत सिंह’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्ध डायलॉगने नवाब मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शार्फ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाज़ूए कातिल में है ।— Nawab Malik (@nawabmalikncp) November 23, 2019