हडपसर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरिता पुकारण्यात आलेल्या भारत बंदला ( Bharat Bandh ) हडपसर, मांजरी परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
“केंद्र सरकारने आणलेले कृषी धोरण हे भांडवलशाहीला फाययेशीर आहे,तर सर्वसामान्य शेतकरी यातून संपणार आहे.भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव नाही. काँग्रेस सरकारने सत्तेच्या काळात आणि नेहमीच शेतकर्यांचा विचार करून त्याच्या पाठीशी सर्व प्रकारच्या मदतीतून उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या आंदोलनातून भाजप सरकारने बोध घ्यावा.
– बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री, काँग्रेस)
महविकास आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजी व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत आंदोलन करण्यात आले.
“आज संपूर्ण देशातील जनता स्वयंम स्फूर्तिने शेतकरी बांधवांच्या मागे खंबीर पणे उभी राहीली यात आनंद वाटला. मोदी सरकारने यातुन बोध घेऊन शेतकरी बांधवांनवर जो जाचक कायद्या लादला आहे. तो रद्द करावा म्हणून जे दोन आडीच महीने अंदोलन चालु आहे. ते काळे कायदे त्वरित रद्द करावेत नाहीतर भविष्यात अजून जास्त संघर्ष करून सरकारला वठनिवर आणावे लागेल.शेतकऱ्या विषयी भाजपा आय टी सेल कडुन सोशल मिडीयात जे गैरसमज पसरविले जात आहेत. ते त्वरित थांबवावे नाहीतर पुढील काळात त्याच्या विरोधात प्रखर अंदोलन उभे करू.
-निलेश मगर (माजी उपमहापौर , राष्ट्रवादी काँग्रेस)
केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता तयार केलेल्या कृषी धोरणाला देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या वतीने सुरु असलेल्या या निदर्शनांमध्ये काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवत मंगळवारी आयोजित भारत बंदमध्ये सहभाग घेतल्याने हडपसर परिसरात देखील या बंदचा मोठ्या प्रमाणात परिणाम पाहायला मिळाला आहे.
“शेतकरी हा बळीराजा आहे. मात्र याच बळीराजाचा बळी देण्याचे काम या कृषी धोरणातून हे भाजप सरकार करत आहे. काबाडकष्ट करून आपल्याला जगवणाऱ्या शेतकरी राजाला संपण्याचे काम हे कृषी धोरणातून होणार आहे. शेतकरी हा देशाच्या उन्नतीचा कणा आहे.त्याच्या सोबत आम्ही नेहमीच राहणार.
महादेव बाबर (माजी आमदार, शिवसेना)
बंद दरम्यान हडपसर भाजीपाला मंडईत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. विशेष म्हणजे सय्यदनगर, चिंतामणी नगर व हडपसर गाव येथे दुपारपर्यंत सर्व दुकानदारांकडून या बंदला प्रतिसाद देण्यात आला.
“शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेध व्यक्त करत आज शेतकर्यांना पाठिंबा म्हणून आंम्ही आज आमचे सर्व भाजी मार्केट शंभर टक्के बंद ठेवले आहे.
-बाळासाहेब भिसे (अध्यक्ष, व्यापरी संघटना हडपसर)