नवी दिल्ली – परदेशी नागरिकांनी आपल्या सनातन संस्कृतीची चुकीची व्याख्या केली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. याचा परिणाम म्हणून विश्व धर्म बनण्याची क्षमता ठेवणारा आपला धर्म केवळ एक रिलिजन बनून राहिला आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
‘संस्कृत नॉन-ट्रान्सलेटेबल्स: ‘द इम्पोर्टेंस ऑफ़ संस्कृटाइज़िंग इंग्लिश’ या पुस्तकाचे आज ऑनलाईन प्रकाशित करण्यात आले. यावेळी मोहन भागवत बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले कि, शब्दांचे ज्ञान, त्यांचे महत्व वास्तविक जीवनात त्यांचे बहुमूल्य स्थान आहे. भावना आणि विचारांना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचे काम शब्दच करतात. चुकीच्या शब्दांच्या वापराने चुकीचा परिणाम होतो.
परदेशी नागरिकांनी आपल्या सांस्कृतिक वातावरण आणि चालीरीतींना पाहिले. परंतु, त्यांची व्याख्या परदेशी नागरिकांनी त्यांचे अनुभव आणि बुद्धीनुसार केली. यामुळे जगभरात भ्रम निर्माण झाला आहे. आपणही आपल्या भाषेला त्यांच्या प्रभावाखाली ठेवले आहे. याचा परदेशी नागरिकांनी त्यांच्या सत्तेसाठी दुरुपयोग केला. ज्या लोकांनी याविरोधात आवाज उठवला. त्यांचा आवाज दाबण्यात आला, असेही त्यांनी सांगितले आहे.