सणबूर -करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.त्यामुळे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी वाय पल्सच्या सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटाची तसेच अंगरक्षकांची सुरक्षा कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्ताकरीता तैनात करण्याकरीता पाठवून दिली आहे. त्यांच्या शासकीय ताफ्यामध्ये सध्या चार गाड्यांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीसयंत्रणा आहे.ना. शंभूराज देसाई यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ना. शंभूराज देसाई यांना गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेकरीता राज्य शासनाने वाय पल्स ही सुरक्षा तैनात केली आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणतेही दौरे होणार नसल्याने ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या संरक्षणासाठी असणारी सुरक्षा कमी केली आहे. ती सुरक्षा आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याने ना. देसाई यांचे कौतुक होत आहे.