पुणे – “वेतनवाढीसह एसटीचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे. अशी आमची मागणी आहे. फक्त पगारवाढ देत आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप कायम ठेवणार’, अशी भूमिका एसटीच्या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
त्यांच्या या भूमिकेला आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा देत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच आहे.
ते पुढे म्हणाले,’ मी त्यांच्या बाजूने आहे. मात्र हि आंदोलन करण्याची ही वेळ नाहीच. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू’ असं म्हणत त्यांनी आपल मत मांडलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास 90 हजारपैकी 73 हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहे.