मुंबई – केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून उद्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे ‘ताली बजाव-थाळी बजाओ’ आंदोलन करणार आहे. सोशल मिडियावर याबदल व्हिडीओ पोस्ट करत बच्चू कडू यांनी याबदल माहिती दिली आहे.
फेसबूक पोस्टमध्ये बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, “मोदिजी तुमच्या मते टाळी व थाळीने कोरोना जाणार होता. आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो आमच्या मागण्या पुर्ण करा. एकीकडे कोरोनाने जिव चालला आहे व आता या जुलमी धोरणाने शेतकर्यांचा जिव घेऊ नका. याबरोबरच त्यांनी सर्व शेतकरी व कार्यकर्त्यांना दि. २० मे रोजी सायंकाळी ६ वाजता या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे.
एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी पुरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे. त्यामुळे केंद्राने रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावेत अशी मागणी देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.