नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाच जानेवारीला उफाळलेल्या हिंसाचारानंतर विद्यार्थ्यांचा एक गट आणिविद्यापीठ प्रशासनात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी कुलगुरू एम. जगदेशकुमार यांना अंतिम इशारा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उपयोगिता आणि सेवा शुल्क गेल्या महिन्यात कमी केले आहे. मात्र हा निर्णय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला नाही. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत कुलगुरूंना हा तोंडी इशारा देण्यात आल्याचे समजते.
सेवा आणि उपयोगिता शुल्क विद्यार्थी भरणार नाहीत हे तुम्हाला ठामपणे माहित होते, तर तुम्ही तसे स्पष्टपणे का सुचवले नाहीत, असे मनुष्यबळ विकास खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी थेट विचारले, असे सूत्रांनी सांगितले. हे शुल्क माफ केले हे विद्याथ्र्यांना योग्य पध्दथीने सांगितले जायाला हवे होते. असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
शुल्क वाढवल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असणारा रोष पाहता उपयोगिता आणि सेवा शुल्क विद्यार्थ्यांऐवजी विद्यापीठ अनुदान आयोगाने भरण्याचा निर्णय या प्रश्नावर नेमलेल्या समितीने 11 डिसेंबर रोजीच घेतला होता. मात्र हा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचवल्याने असंतोष वाढला.
भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी कुलगुरू जगदेशकुमार यांना हटवण्याची काल मागणी केली. त्यानंतर त्याबात मनुष्यबळ विकास खात्यावरील दबाव वाढला आहे, असे मानले जाते.