नवी दिल्ली – भारतात १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही भारतातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसेच काही शहरात नागरिक अजूनही घराच्यांबाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू हरभजनसिंग याने करोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारला सहकार्य असे आवाहन केले आहे.
सरकारला मदत करणे आपले कर्तव्य आहे. आगामी तिन आठवड्यांचा काळ अत्यंत काळजीचा आहे, त्यासाठी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आपण व आपले कुटुंब तसेच सहकारी या सर्वांचे आरोग्य जपण्याची आपली जबाबदारी आहे, आपल्या एका चूकीचा फटका अनेकांच्या आयुष्यासाठी जिवघेणा ठरू शकतो, असे क्रिकेटपटू हरभजनसिंग यानेही व्यक्त केले आहे.