मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालनंतर तब्बल एका महिन्या नंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट आज संपुष्टात आली आहे. राजभवनात ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यातील संपूर्ण घडामोडी सोशल मीडियामुळे राजकीय रंग चढला आहे.
नव्या सत्ता समीकरणाला विविध मुद्यांची भावनिक जोड देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच नव्या सत्ता समीकरणा सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे.
यातच,सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्सने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर सोशल मीडियावर,’उठा, उठा ! मी पुन्हा आलो !!’ अशा प्रकारचे मिम्स शेअर करत व्हाट्स ऍप, फेसबुक, ट्युटरसारख्या सोशल माध्यमांवर नेटकरी चांगलेच ट्रोल केले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाराष्ट्रातील राजकारणात नवे वळण आणले आहे. यामुळे सध्या शिवसेनेसह राजकीय पक्षात खलबतं माजली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती.
मात्र ऐनवेळी फासे पलटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे तर काही खिल्ली उडविणारे विनोद सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.