श्रीनगर: पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नजर कैदेतून मुक्तता होताच त्यांनी कलम ३७० परत मिळवण्याची हाक काश्मिरी जनतेला दिली आहे. कैदेतून मुक्तता झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
After being released from fourteen long months of illegal detention, a small message for my people. pic.twitter.com/gIfrf82Thw
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 13, 2020
कैदेतून मुक्तता झाल्यानंतर मुफ्ती यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे की,’दिल्लीनं जे हिसकावून घेतलं आहे, ते परत मिळवायचं आहे,”
त्या पुढे म्हणाल्या,’५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल. असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.
दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांना ऑगस्ट २०१९ पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० च्या तरतुदी रद्द केल्या. यावेळी सरकारने सर्व नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि इतर अनेक राजकारण्यांचा सहभाग होता. अलीकडेच अन्य नेत्यांनाही कोठडीतून मुक्त करण्यात आले होते, ज्यात फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.