नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवरून मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारत सरकार काश्मिरी पंडितांची दुर्दशेकडे दुर्लक्ष करू इच्छित आहे, कारण त्यांच्या कठोर धोरणांमुळे त्यांच्या दुर्दैवी हत्या झाल्या आहेत. सरकार आम्हाला शत्रू म्हणून पाहत आहे, त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
GOI wants to push the plight of Kashmiri pandits under the rug because its their callous policies that’ve led to unfortunate targeted killings of those who chose not to flee. Projecting us mainstream as their enemy is why Ive been placed under house arrest today. pic.twitter.com/GliRJaJX45
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 21, 2022
आणखी एका ट्विटमध्ये मेहबुबा यांनी लिहिले की, “चोटीगाममध्ये आज सुनील कुमारच्या कुटुंबीयांना भेटण्याचा माझा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. जेव्हा तेच प्रशासन प्रत्येक कानाकोपऱ्यात जात असताना आम्हाला कुलूप लावणे हे चुकीचे असल्याचा दावा करत आहे.
यापूर्वी मेहबूब मुफ्ती यांनी काँग्रेसच्या ‘आप’ विरोधी आंदोलनांवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांना एकत्र करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. यावर काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांची गॅंग भ्रष्ट कृत्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा.