नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होती. ही बैठक नुकतीच संपली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यातील पक्षातील नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यासंदर्भात आज दुपारी ४ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे, आणि या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तेतील सहभागाबाबत निर्णय होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Congress leader Mallikarjun Kharge after party’s Working Committee meeting ends: We have called our Maharashtra leaders to Delhi for further discussions, the meeting will be at 4 pm. https://t.co/A95BwEaOW9 pic.twitter.com/iMEFMsh8cD
— ANI (@ANI) November 11, 2019
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही कॉंंग्रेससोबत चर्चा घेऊऩच आमचा निर्णय जाहीर करू, दुसरीकडे कॉंंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज कॉंंग्रेसची बैठक होणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात कॉंंग्रेसची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sharad Pawar, NCP on Shiv Sena MP Arvind Sawant’s resignation as Union Minister: I haven’t had a word with anyone regarding anyone’s resignation.We’ll have a word with Congress today.Whatever decision is to be taken will be taken only after discussions with Congress. #Maharashtra https://t.co/qgI4HIzPff pic.twitter.com/CFLve9vo0u
— ANI (@ANI) November 11, 2019
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाले. त्यानंतर भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर बोट ठेवत सत्ता स्थापन करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आज शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.