जनधन खात्यात ७ हजार ५०० रुपये जमा करण्याची मागणी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात ३ में पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी काँग्रेसच्या सल्लागार कमिटीची बैठक झाली. यावेळी बैठकीत कोरोना विषाणूसंदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले कि, बैठकीत प्रत्येक व्यक्तीच्या जनधन खात्यात ७ हजार ५०० रुपये जमा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात १७ हजार २६५ जणांना कोरोनाचे संक्रमण झाल्याची माहिती दिली आहे. तर ५४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ५४६ आहे. रविवारी सायंकाळी देशात नवे १ हजार ३२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ हजार २०३ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर,२२३ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात ५०७ कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सार्वधिक २ हजार ५०० कोरोनाबाधितांचा आकडा मुंबईत आहे.
दिल्लीत २ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण
लॉकडाऊननंतर देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.दिल्लीत आतापर्यंत २ हजार ३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत ४२ जणांचा कोरोना संक्रमणामुळे बळी गेला असून ७२ जण आतापर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत.