मुंबई : संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली.
यावेळी महाराष्ट्राचे केंद्र सरकाकडे प्रलंबित असणारे विषय निकाली काढण्यासाठी एका समितीचे आयोजन करण्यात येणार आहे. या समित्या विषयानुरूप असतील.
या समित्यांनी दिलेल्या आवाहलाची सरकार समीक्षा करणार आहे.खासदार अरविंद सावंत या समितीचे समन्व्यक म्हणून काम पाहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.