पाचगणी – जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीचा विकास आरखडा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी मेढा शहरात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. मेढा शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आरखड्याबाबतीत हरकती घेण्यात आल्या आहेत. आज विकास आराखड्याबाबतीत हरकती नोंदवत असताना मेढा शहरात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहराचा विकास आराखडा म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेला अन्याय आहे. शहरातील शेतकरी अल्पभूधारक आहे. याच शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण येणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मेढा शहराचा विकास नक्की व्हावा. मात्र, तो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून नको, अशी व्यथा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत होती.
मेढा शहराच्या विकास आराखड्यात शासकीस जागेवर आरक्षण टाकून .शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. अन्यायकारक विकास आराखडा रद्द न केल्यास यापुढे वेळ पडली तर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी मेढावासीयांनी केली आहे .