कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर मध्ये नवरात्र उत्सव निमित्त तयारीला आता वेग आला आहे. दर्शन मंडप उभारणी, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, भक्तांसाठी पाण्याची तसेच सुलभ शौचालय आदी व्यवस्था करण्यात येत आहेत. दरम्यान, श्रीच्या दर्शनासाठी ई पेड पास बाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे,
याबाबत न्यायालयाने म्हणणे मांडण्यासाठी सोमवार पर्यंत वेळ दिली आहे. 2010 च्या अध्यादेश मध्ये काही बदल झाला आहे का, हे पाहण्यासाठी आमच्या विधीन्य यांनी वेळ मागितला आहे. सोमवारी काही बदल आडलून आल्यास त्याबाबतचे सादरीकरण करण्यात येईल, असेही देवस्थानचे सचिव नाईकवाडे यांनी सांगितले.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई देवीच मंदिर लाखो रंगीबेरंगी एलईडी लाईट्सनी उजळून निघालेल आहे. नवरात्र उत्सव अवघा एका दिवसा वर आला आहे. या पार्श्वभूमी वरती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शिखरांना लाखो एलईडी लाईट लावण्यात आले आहेत.