मुंबई- अंतिम वर्षाच्या परिक्षा या आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी अभ्यासाला लागायला हवं, त्यांची परिक्षा MCQ पद्धतीने होणार असल्याचंही समजतं आहे. मात्र विद्यार्थांना याबद्दलची काहीच माहिती नाही त्यामुळे त्यांना प्रश्नसंच पुरवायला हवे, अशी मागणी युवा सेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही. पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे. हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अंतिम वर्षाच्या परिक्षा आॅनलाईनच होणार आहेत त्यासंदर्भातील महाविद्यालयाकडून प्रकाशित होणारा गुगल फाॅर्म विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत भरून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आॅनलाईन परिक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन परिक्षा देणे शक्य नसेल त्यांना आॅफलाईन परिक्षा देता येणार मात्र त्याचं ठोस कारण गुगल फाॅर्ममध्ये भरणे अपेक्षित आहे.
युवा सेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांचा अंतिम वर्षाच्या परिक्षेला नकार होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही परिक्षा बंधनकारक झाली आहे. मात्र आता ही परिक्षा घरी बसून आणि MCQ पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.