बदायूं (उत्तर प्रदेश) – बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी प्रचारसभेत बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला अली किंवा बजरंगबली यापैकी कोणाचेच मत मिळणार नसल्याचे म्हंटले आहे. बीएसपी-एसपी-आरएलडी आघाडीचे समाजवादी पक्षाचे उमेदवार धर्मेंद्र यादव यांच्या प्रचार सभेमध्ये मायावती बोलत होत्या.
उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत योगी पक्षाला अलीचे मत किंवा बजरंजबलीचे मत मिळणार नाही. पण आम्हाला या दोन्हीची गरज असल्याचे सांगत, मायावतींनी बजरंजबलीची जात आम्ही नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितली असल्याचे त्या म्हणाल्या.
Mayawati on UP CM remark,"Agar Congress,SP,BSP ko 'Ali' par vishwaas hai toh humein 'Bajrangbali' par vishwaas hai": Hamare Ali aur Bajrangbali dono hain. Bajrangbali isliye bhi chaiye kyunki ye meri dalit jaati se jude hain, inki jaati ki khoj maine nahi ki, khud UP CM ne ki hai pic.twitter.com/LSfI07KJs0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 13, 2019
यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाला जर अली वर विश्वास असेल तर आम्हाला बजरंजबली वर विश्वास असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज मायावती यांनी योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.