नवी दिल्ली – देशातील तापमानात सध्या बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर, काही ठिकाणी अजून सुद्धा तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा वाढत आहे.
देशाभरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असाताना राजस्थानमधील चुरु शहरात आज (सोमवारी) तब्बल 50.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तापमानाने पन्नाशीचा पारा ओलांडला. राज्यातही विविध भागातही उष्णतेचा पारा वाढला आहे.
India Meteorological Department: Maximum temperature of 50.3°C recorded in Churu, Rajasthan, today. pic.twitter.com/3AmvbPdecb
— ANI (@ANI) June 10, 2019
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील चुरु शहरात सोमवारी 50.3 डिग्री सेल्सियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली.