मुंबई – शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकताच गौप्यस्फोट केला आहे. मविआचे आमदार रात्री-अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात असे जाधव म्हणाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे.
खासदार प्रतापराव जाधव यांनी गौप्यस्फोट करतांना आदित्य ठाकरे यांचावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रतपागड म्हणजेच मेहकर मध्ये येऊन सभा घेतलीय आणि स्थानिक आमदार खासदार यांच्यावर ,गद्दार म्हणत टीका केली यावर प्रत्युत्तर देत खासदार प्रतापराव जाधव यांनी गौप्यस्फोट केला.
माध्यमांशी बोलतांना जाधव म्हणाले,’जशी सत्ता गेली तेव्हा पासून काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री भेटतात आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतात.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेस फुटणार, भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात काही आमदार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य फेटाळून लावलं. चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य मागेही घेतलं. अशातच प्रतापराव जाधव यांनी गौप्यस्फोट केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.