मॅंचेस्टर – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. न्यूझीलंडने हा सामना 18 धावांनी जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयासाठी 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 49.3 षटकांत 221 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 239 धावा केल्या होत्या.
भारताच्या सलामीच्या जोडीस बाद करणारा मॅट हेन्री हा सामन्याचा मानकरी ठरला. त्याने 37 धावांत 3 बळी घेतले. बोल्ट व मिचेल सॅन्टेर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.