मसूर -मसूरच्या ग्रामसचिवालय इमारतीस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. मसूर ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रदीप विधाते. मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार जगदाळे, मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे. सभापती प्रणव ताटे, अविनाश फडतरे, आबासाहेब पवार, सारंग पाटील, सुदाम दीक्षित, लहुराज जाधव, आर. जे. पाटील, विक्रांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, मसूर हे कराड तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात या भागातील चळवळीचे ते मुख्य केंद्र होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार थोर स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यसाठीच्या युद्धात मसूरच्या स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा सहभाग राहिला आहे. ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, मसूर ग्रामपंचायतीची नवी इमारत सर्वांच्या सहकार्याने उभी राहत आहे. करोना संकटकाळात सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, मसूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायतीत जनशक्ती पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलो. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. आम्ही मतदारांना दिलेला शब्द पाळला आहे. पहिले पुष्प नवीन ग्रामसचिवालय इमारतीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत.
सरपंच पंकज दीक्षित यांनी, या इमारतीत तळमजल्याच्या ठिकाणी स्टोअर व वाहनांसाठी पार्किंग, ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दालन, बैठक हॉल, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, कृषी अधिकारी व तलाठी कार्यालय असणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कादर पिरजादे, नरेश माने, लालासाहेब पाटील, डी. बी. जाधव, माणिकराव पाटील, बच्चू भाई शहा, डॉ. शरद काळे, दिलीप पाटील, नितीन भाटे, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, रणजीतसिंह जगदाळे, विकास स्वामी, विकास पाटोळे, दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, जगदीश पुरोहित, जगदीश वेल्हाळ उपस्थित होते.