कोल्हापूर – कोल्हापूरच्या महाडिक वसाहतीत अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने भस्मसात झाली आहे आहे ही घटना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून अग्निशमन विभागाच्या तीन बंबांनी घटनास्थळी भावगीत तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.
या दुर्घटनेत सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल असून कोणतीही जीवित हानी झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र अचानक आगलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही त्याचा शोध अग्निशमन विभाग घेत आहे.