चिपळूण – भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी रेकी करत असताना भुस्खलन झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिपळूण येथील जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. सुभेदार अजय ढगळे यांचा बर्फ आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ढगळे यांचे पार्थिव सोमवारी चिपळूणमधील मुळगावी चोरवणे आणण्यात येणार आहे.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी जागेची रेकी करण्यासाठी सुभेदार अजय ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततच्या हिमवृष्टीमुळे 24 मार्च रोजी भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले.