Rakhee Gulzar love Story : 53 वर्षांपूर्वी झालं लग्न, पण एका गैरसमजाने तुटलं नातं; राखी-गुलजार यांच्या प्रेमकथेचा अनोखा शेवट
Rakhee Gulzar love Story : विशेष म्हणजे, एका गैरसमजामुळे राखी आणि प्रसिद्ध गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांचे नाते तुटले, मात्र त्यांनी कधीही अधिकृतपणे घटस्फोट घेतला नाही.

Rakhee Gulzar love Story : 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री राखी गुलजार सध्या आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करण्यात काय हरकत आहे? असा सवाल उपस्थित करत अभिनेत्रीने आमिरला पाठिंबा दिला आणि असेही सांगितले की, तिने गुलजार यांच्याशी लग्न केले तेव्हा ते ४० वर्षांचे होते.
मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक अशी कहाणी आहे, जी आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिलेल्या नात्यांपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे, एका गैरसमजामुळे राखी आणि प्रसिद्ध गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांचे नाते तुटले, मात्र त्यांनी कधीही अधिकृतपणे घटस्फोट घेतला नाही. नेमकं कसं राहिलं होतं या दोघांचं नातं जाणून घेऊयात….
गुलजार यांच्याशी लग्न करण्यापूर्वी राखी यांचा विवाह बंगाली चित्रपट दिग्दर्शक अजय बिस्वास यांच्याशी झाला होता. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि अवघ्या दोन वर्षांत या नात्याचा शेवट घटस्फोटाने झाला. त्यानंतर राखी आणि गुलजार एकमेकांच्या जवळ आले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 15 मे 1973 रोजी त्यांनी विवाह केला.

Rakhee Gulzar
लग्नानंतर दोघांचे आयुष्य आनंदात सुरू होते. मात्र, काही वृत्तांनुसार गुलजार यांनी लग्नापूर्वी राखी यांच्यासमोर चित्रपटांमध्ये काम न करण्याची अट ठेवली होती. राखी यांना वाटत होते की पुढे जाऊन ते त्यांना समजून घेतील, पण तसे घडले नाही. लग्नानंतरही त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स येत राहिल्या, मात्र त्या स्वीकारण्याबाबत दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले.
हेही वाचा : Weather Update : मुंबई-पुण्यासह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मराठवाड्यात मान्सून लांबणीवर? महत्वाची अपडेट समोर
…अन् दोघांमध्ये जोरदार वाद
या नात्यातील निर्णायक वळण ‘आंधी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आले, असे सांगितले जाते. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या शूटिंगवेळी एका पार्टीत घडलेल्या घटनेमुळे राखी यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला. एका अभिनेत्रीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गुलजार तिच्या खोलीत गेले होते. मात्र, संपूर्ण घटना माहीत नसल्याने राखी यांनी त्याचा वेगळाच अर्थ लावला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

Rakhee and Gulzar
दोघांनी घटस्फोट घेतला नाही
याच काळात दिग्दर्शक यश चोप्रा यांनी राखी यांना ‘कभी कभी’ चित्रपटाची ऑफर दिली. गुलजार यांच्या संमतीपूर्वीच राखी यांनी चित्रपटासाठी होकार दिला. या निर्णयामुळे दोघांमधील मतभेद आणखी वाढले आणि अखेर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, विभक्त झाल्यानंतरही राखी आणि गुलजार यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. त्यांची मुलगी मेघना गुलजार हिच्या भविष्यासाठी आणि तिच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.
आईचा रोल मिळत गेला
वेगळे झाल्यानंतर राखी यांनी चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द नव्याने उभी केली. आईच्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या ‘करण अर्जुन’सह अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आजही राखी आणि गुलजार यांच्या नात्याची ही कहाणी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या प्रेमकथांपैकी एक मानली जाते.





