- मागणी जास्त भावात मात्र वाढ
पुणे – राज्यात पावसाच्या माऱ्याने भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या हलक्या प्रतीच्या आहेत. मात्र, त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे गड्डीचे भाव वाढल्याची माहिती विक्रेते धनजंय माने यांनी दिली.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्हा, विभागासह परराज्यातून भाज्यांची आवक होते. मात्र, पुणे विभागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान होत आहे.
पाऊस थांबत नसल्याने काढणी होत नाही. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळेच काही फळभाज्यांचे किलोचे भाव 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर पालेभाज्यांच्या गड्डीचे भावाने 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
किरकोळ बाजारातील किलोचा भाव
शेवगा 150 रुपये
श्रावण घेवडा 150 रुपये
मटार 150 रुपये
गवार 100 रुपये
भेंडी 80 रुपये
दोडका 80 रुपये
पालेभाज्या गड्डीचे भाव
मुळा 40 ते 45 रुपये
कोथिबीर 30 ते 40 रुपये
पालक 25 ते 30 रुपये
मेथी 25 ते 30 रुपये
कांदापात 25 ते 30 रुपये
अंबाडी 20 ते 25 रुपये