निदर्शने मागे घेण्यासाठी मोर्चामुळे संघर्षाची शक्यता
नवी दिल्ली : शाहीन बाग येथे सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधात (का) सुरू असणाऱ्या आंदोलनाला रविावरी 50 दिवस पूर्ण झाले. दरम्यान, हे ठिय्या आंदोलन मागे घेऊन रस्ता तातडीने मोकळा करावा, या मागणीसाठी नागरिकांच्या गटाने मोर्चा काढला. दरम्यान तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शाहीनबागच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चात कोणत्याही जातीय घोषणा दिल्या जाऊ नये, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शाहीनबाग येथे सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे रहदारीला अडथळा होतो, अशी या नागरिकांची तक्रार आहे. या आंदोलनामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रस्ता आडवणारे हे आंदोलन मागे घ्यावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
फरिदाबाद, नोईडा आणि दिल्ली येथे मोर्चेकरी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे काही तरी अघटीत घडण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सह आयुक्त देवेश श्रीवास्तव आणि उपायुक्त चिन्मय बिस्वाल जातीने उपस्थित आहेत.