मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे ती मुंबईत दाखल झाली. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह कंगना मुंबईत दाखल झाली आहे.
कंगना राणावत मुंबईत येण्यापूर्वीच पाली हिल परिसरात असलेल्या तिच्या कार्यालयावर 11 वाजताच्या सुमारास मुंबई महापालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केली. यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली.
दरम्यान,अभिनेत्री कंगना राणावत आणि सत्ताधारी शिवसेना हे प्रकरण चांगलेच चिघळले असून यामध्ये आता मराठी अभिनेता ‘शशांक केतकर’ने उडी घेतली आहे. शशांक ने फेसबुकवर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. “कंगना राणावत याचं ऑफिस अनधिकृत असेलही..? पण मग ते पूर्ण होई पर्यंत का थांबले होते सगळे? आधी परवानगी कोणी दिली..?” अश्या आशयाचे ट्विट शशांकने केले आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/ShashankKetkarOfficial/posts/3047478658696282