पुणे – प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथील ग्राहक पेठेत धान्य आणि कडधान्यापासून भारताचा नकाशा साकारण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षात देशात धान्याची समृध्दी दिसावी आणि सर्व शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना हे वर्ष सुख समृध्दीचे जावं अशी भूमिका त्यामागे आहे. अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.
देशात धान्य जर मुबलक आलं तर शेतकरी सुखी होईल आणि ग्राहकांना कमी भावात धान्य मिळाल्यास ग्राहकही सुखी होईल. त्यामुळे भारताचा नकाशा हा धान्य-कडधान्यपासून साकारला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी हा नकाशा पाहण्यासाठी याठिकाणी भेट द्यावी असं आवाहनदेखील त्यांनी यावेळी केलं आहे.