बचाव पक्षाचा सवाल
पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटना प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रात टोपन नावे मिळून आली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला. मात्र, काही पत्रात कॉमेड प्रकाश आंबडेकर असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांची साधी चौकशी का केली नाही, असा सवाल बचाव पक्षाच्या वतीने ऍड. रोहन नहार यांनी उपस्थित केला.
सध्या सत्र न्यायाधीक्ष एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. यावेळी तेलगु कवी वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्या वतीने रोहन नहार यांनी बाजू मांडली. शोमा सेन यांची बाजू मांडतांना राहूल देशमुख म्हणाले, सेन यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूमध्ये काहीही सापडले नाही.
पोलिसांना चार पत्र सापडले असून ते कोणी पाठविले आहे याचा उल्लेख नाही. सेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. अत्याचारित स्त्रियांचा आवाज सेन उठवत असतात. यात कुठलेही शस्त्र वापरल्याचा पुरावा नाही हा गुन्हा होऊ शकत नसल्याचे देशमुख म्हणाले. तसेच एल्गार परिषदेतमुळे भीमा कोरेगाव येथे दंगल झाले असल्याचे सांगत असताना कोणाचेही म्हणणे नोंदवले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. तर सुद्धा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हर्नान गोन्सालविस यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.