पुणे : बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा निर्णय सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर म्हणणं मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी बचाव पक्षांकडुन सोमवारी करण्यात आली.
तर या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामूळे एनआयएच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली.
त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. त्याच दिवशी दोन्ही पक्ष आपले म्हणणे सादर करणार असून न्यायालय त्यावर निकाल देणार आहे.