नवी दिल्ली : देशभरात करोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. तसेच रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार अडकून पडेल आहेत . या समस्येवर कामगार तोडगा काढत पायीच आपापल्या मूळ गावी जाताना दिसत आहे. मात्र याविषयी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे मजुरांना आपल्या नियोजित ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोज ३०० ट्रेन चालवू शकते. परंतु अनेक राज्य त्यासाठी परवानगी देत नसल्याचे ते म्हणाले.
कई राज्य ट्रेनों को नही आने दे रहे हैं। जबकि उत्तर प्रदेश व बिहार के लिये कई ट्रेन चल चुकी है।
प.बंगाल के गृहमंत्री ने पत्र लिखने के बाद भी 9 मई तक सिर्फ 2 गाड़ियां ली। हमें बताया कि 8 गाड़ियों की अनुमति 8 मई को दी गयी है, लेकिन आज तक भी पूरी 8 गाड़ियां नही ली गयी: @PiyushGoyal
— Piyush Goyal Office (@PiyushGoyalOffc) May 13, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपल्या सर्व मजूर बांधव आणि भगिनींसाठी रोज ३०० रेल्वे गाड्या चालवता येऊ शकतात. देशातील निरनिराळ्या भागात या रेल्वे चालवून त्या मजुरांना घरी पोहोचवू शकतात. अशा १२०० रेल्वे गाड्या आम्ही तयार ठेवल्या आहेत. परंतु या रेल्वे गाड्या मजुरांच्या सेवेत पोहोचवता येत नाहीत. अनेक राज्य ट्रेन आपल्या राज्यात आणण्यास परवानगी देत नाहीत, असे पीयूष गोयल म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
ज्या लोकांना आपल्या राज्यात परतायचे आहे त्यांना परतू द्या अशी विनंती मी सर्व राज्यांना करत आहे, असे सांगत पियुष गोयल यांनी उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या. बिहारमध्येही १७० ट्रेन पोहोचल्या. गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्रव्यवहारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सुरूवातीला ९ मे पर्यंत केवळ २ ट्रेनना परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी एक अजमेर शरीफ, राजस्थानवरून आणि दुसरी एर्नाकुलमवरून जाणारी होती.
गृहमंत्र्यांच्या पत्रानंतर आम्हाला समजलं की ८ तारखेनंतर ८ ट्रेनना परवानगी देण्यात आली आहे. ९ तारेखेच्या दुपारपर्यंत या परवानगीबाबत कोणतीही कल्पना नव्हती. १३ मे च्या दुपारी ३ वाजेपर्यंत देशाच्या निरनिराळ्या भागातून पश्चिम बंगालसाठी केवळ ७ ट्रेनच सोडता आल्या. ट्रेन रिकाम्या पडल्या आहेत, परंतु आम्हाला त्या पाठवता येत नाहीयेत,असेही गोयल यांनी सांगितले.