पुणे( प्रतिनिधी) – गर्भावस्थेत अनेक व्यंग असल्याने वैद्यकीय चाचण्यांमध्ये लक्षात आल्याने तसेच जन्मानंतर बालकावर शल्यचिकित्सेद्वारे देखील सुधारणा हाेण्याची धुसर शक्यता असल्याने गर्भपात करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी मत एका केसमध्ये नाेंदवले हाेते. त्यामुळे याबाबत गर्भपातास परवानगी मिळावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असता, न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिल्याची याचिकाकर्त्यांचे वकील तेजस दंडे व अॅड. भरत गढवी यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाचे या निर्णयामुळे दाेन विवाहित दांम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांचे मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात दाेन वेगवेगळया याचिका याकामी दाखल करण्यात आल्या हाेत्या.
याचिका कर्त्यांचे वतीने अॅड.तेजस दंडे व अॅड.भरत गढवी यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे के.आर.कुलकर्णी यांनी बाजु मांडली. दाेन्हीही गर्भामध्ये पाठीच्या कण्यात व्यंग, हदयाला असलेले छिद्र, मेंदुची अपुरी वाढ, डाेक्याच्या आकाराची अवाजवी वाढ इत्यादी अनेक व्यंगे हाेती.
गर्भधारणेचा कालावधी लक्षात घेतल्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज हाेती. मागील आठवडयात त्यावर उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर दाेन्ही विवाहित महिलांचा पुण्यातील ससून रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. काेराेनामुळे सर्वताेपरी काळजी घेत संबंधित महिलांना आवश्यक सुविधा रुग्णालयात पुरविण्यात आल्या. ससूनचे अधिष्ठता डाॅ.मुरलीधर तांबे यांचे देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.