नवी दिल्ली – वाहन उद्योगात मंदी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात असे आवाहन वाहन उत्पादकांची संघटना सिआमने केले.
या संघटनेचे अध्यक्ष राजन वधेरा आणि महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे की, केवळ वाहन उद्योगाची मागणी कमी झालेली नाही तर इतरही ग्राहक वस्तूंची मागणी कमी झालेली आहे. ही मागणी वाढावी यासाठी सरकारकडून प्रयत्न अपेक्षित आहेत. वाहन उद्योगाला प्राधान्य क्रमांकाचे क्षेत्र म्हणून मान्यता मिळावी अशी आमची इच्छा आहे. या उद्योगाला उत्सर्जनाचे नवे मानदंड स्वीकारण्याची तयारी करावी लागणार आहे.
दरम्यानच्या काळात व्याजदर आणि इतर कारणांमुळे वाहन विक्री कमी होत आहे. बऱ्याच कार कंपन्यांनी त्यामुळे आपल्या उत्पादनात कपात केलेली आहे. त्याचा रोजगार निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.