मुंबई – मनसुख हिरेन यांची हत्या झाली असल्याचा संशय त्यांची पत्नी श्रीमती विमला हिरेन यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात आयपीसी 302, 201, 120 ब अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्यांनी कोणी जिलेटिनच्या काड्या स्कॉर्पिओ गाडीत ठेवल्या त्यांचा शोध सुरू असून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत देखील एटीएसकडून तपास योग्य दिशेने सुरू आहे. तपासाअंती सत्य बाहेर येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.