Manoj Jarang on Dhananjay Munde। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहे. ज्या हॉटेलमध्ये वाल्मीक कराडने देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन आखला त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे आता पुन्हा एकदा विरोधकांकडून कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. याच फुटेजवरून आता मनोज जरांगे यांनी देखील मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.
“ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे ” Manoj Jarang on Dhananjay Munde।
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी “बीड जिल्हा हा पवित्र आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या टोळीने वाईट बघण्याची वेळ आणली आहे. एका जागेवर बसून तुम्ही खंडणी आणि खून करायचा कट शिजवायला लागले आहे. एका मंत्राच्या सपोर्टने तुम्ही अनेक वेळा टोळ्या चालवल्या. मात्र खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे. अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तर ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना करत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.
वाल्मिक कराड , सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचेच हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे समोर आले आहे. या विषयी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
आता कुणालाही सोडता येणार नाही Manoj Jarang on Dhananjay Munde।
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. याविषयी त्यांनी,”मुख्यमंत्र्यांना माझे एक सांगणे आहे की, फोन आणि खंडणी मधील जे फरार आरोपी आहेत ते कोणाशी बोलले यांचे CDR काढावे. तर जे आरोपी पळून गेले त्यांना सांभाळले कुणी? पैसा कोणी पुरवला? हे कोण यांना सह आरोपी केलं पाहिजे. ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. आता कुणालाही सोडता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना या निमित्याने आमचे सांगणे आहे की, यात कुणाचाही जामीन झाला नाही पाहिजे. त्यांचा जामीन झाला तर देशमुख कुटुंबाला धोका आहे. समोर व्हिडिओ येत असेल तर मुख्यमंत्र्यांना हे चॅलेंज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टोळ्यांचा सुपडा साफ करणे गरजेचे आहे. “असेहीत्यांनी यावेळी म्हटले आहे.
आरोपींना पाठीशी घालत असाल तर ते योग्य होणार नाही
एक माणूस राज्य चालवत नाही. नाहीतर तुमच्यावरचा देखील विश्वास उडेल. ही प्रॉपर्टी सरकारमधील मंत्र्याची आहे. सध्या सीआयडी एसआयटी आणि बीड जिल्ह्याचे पोलीस प्रशासन योग्य ट्रक वर काम करत आहे. ज्या दिवशी आम्हाला कळेल तुम्ही चार्जशीटमध्ये फेरफार करत असाल, आरोपींना पाठीशी घालत असाल तर ते योग्य होणार नाही. आता ईडी कुठे आहे? ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांना आत टाकले पाहिजे. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत, ते सुटता कामा नये. त्यांच्यावर 302 लावा आणि संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्या टोळीलाही जेरबंद करा, अशी मागणी ही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.