शिरूर (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस सगळीचकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरजूंच्या मदतीसाठी माणिकचंद उद्योगसमूहाचे प्रमुख उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल, उद्योगपती आदित्य प्रकाशभाऊ धारिवाल व धारिवाल कुटुंबियांच्या वतीने शिरूर शहरात शिरुर नगर परिषद व सकल जैन समाज यांच्या सहयोगाने कम्युनिटी किचन सुरू केले.
चाळीस दिवसांपासून रोज साडेचार ते पाच हजार नागरिकांना मोफत जेवणाचे डबे धारिवाल कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील गरजूंचा दोन वेेळच्या जेवनाचा प्रश्न मीटला आहे.
दरम्यान, योद्धा ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरूर पोलीस स्टेशन , नगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांच्यासह शहरातील गोरगरीब मजूर ,वृद्ध नागरिक, रस्त्याने पायी आपल्या गावी जाणारे राज्यातील व परप्रांतीय नागरिक यांना ५००० रोज जेवणाचे डबे देण्यात येत आहे.