नगर – पारनेर तालुक्याला वरदान ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे.मांडओहळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दश लक्ष घनफुट तर उपयुक्त साठा ३१० दश लक्ष घनफुट असून पाणीपातळी ७२७.३० असून एकूण पाऊस ३१८ मिली मिटर झाला असून आज ३५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर सांडव्यातून १० सेंटी मिटर असून ९०० क्यूसेसने विसर्ग होत आहे अशी माहीती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली.
याशिवाय पळशी तलाव भरला असून तिखोल,भाळवणी,काळू तलाव,मांडवा,ढोकी नं.१,ढोकी नं.२ तलावातही मोठ्या प्रमाणात आवक होत असून अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरीत तलावही लवकरच भरतील.मांडओहळ मध्यम प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील ज्वारी,कांदा,गहू,हरबरा,वाटाणा,टोमँटो आदी पिके शाश्वत झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
मांडओहळ मध्यम प्रकल्प पर्यटकांना खुणावतोय…!
मांडओहळ धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे या ठिकाणी फेसाळणारे धबधबे पाहता पर्यटकांची मांदीयाळी मोठया प्रमाणावर वाढली असून शासनाने या ठिकाणी आजतरी कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही.गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी नगर येथील एका डाँक्टरचा धबधब्यात पडून मृत्यू झाला होता.त्यामुळे शासनाने याठिकाणी पर्यायी उपाय योजना करण्याची गरज आहे.
पर्यायी तांबडी कार प्रकल्प कार्यन्वित होण्याची गरज – सुर्यभान भालेकर
मांडओहळ मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असून जवळपास ९०० क्युसेस ने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पर्यायी हे वाया जाणारे पाण्याला तांबडी कार प्रकल्प मार्गी लागल्यास पारनेर तालुक्यातील शेतक-यांना शेती सह पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पर्याय आहे असे निवृत्त शाखा अभियंता सुर्यभान भालेकर यांनी खंत व्यक्त केली.