कोलकाता: नीति आयोगाची येत्या 15 जुनला बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहणे आपल्याला जमणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसे त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळवले आहे. बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की निती आयोगाला कोणतेही अर्थिक अधिकार नाहीत.
त्यामुळे राज्यांच्या नियोजनात त्यांना काही लाभ होईल असे मला वाटत नाही त्यामुळे या आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणे निष्फळ ठरणार असल्याने आपण या बैठकीला उपस्थित राहू इच्छित नाही असे त्यांनी म्हटले आहे. नियोजन आयोग रद्द करून नीति आयोगाची स्थापना करणे अयोग्य असल्याचे त्यांचे खूप पहिल्यापासूनचे म्हणणे असून त्यांनी यापुर्वीच्याही नीति आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते. येत्या 15 जूनला पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून त्यात देशाच्या विकासावर चर्चा होणार आहे.