नवी दिल्ल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरीही त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याचे सांगितले. आणि ममता दीदी प्रत्येक वर्षी मला दोन कुर्ते आणि मिठाई पाठवितात, असेही मोदींनी सांगितले. यावर आता ममता बॅनर्जींनी पलटवार केला होता की, ‘मी जरी मिठाई आणि कुर्ते पाठवत असले तरीही अशा लोकांना मत देत नाही.’ अशी टीका ममता बॅनर्जींनी मोदींचे नाव न घेता केली.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘वैयक्तीक संबंध आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही व्यक्तीशी आमचे शत्रुत्व नाही. आमची लढाई वैचारीक आहे. ही लढाई निःपक्ष आणि सकारात्मक असली पाहिजे, ममता दीदी आता खूप बदलल्या आहेत. आमचे व्यक्तीगत संबंध चांगले असले तरी आमच्यात वैचारीक मतभेद असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.