बोलपुर – नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन केल्यामुळेच त्यांच्यावर आरोप करून त्यांना त्रास दिला जात आहे असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
विश्व भारती या केंद्रीय विद्यापीठात अमर्त्य सेन यांच्या कुटुंबियांनी बेकायदेशीरपणे जागा बळकावली असल्याचा आरोप केला गेला आहे, त्याबद्दल ममतांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात राजकीय मतप्रदर्शन करणाऱ्या सर्वांनाच अशा स्वरूपाच्या आरोप व कारवायांना सामोरे जाव लागत आहे, मलाही असाच त्रास दिला जात असून अमर्त्य सेन यांच्या सारख्या विख्यात नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थत्ज्ञांनाहीं याच स्वरूपाच्या स्थितीला सामोरे जावे लागत आहे हे संतापजनक आहे असेही ममतांनी म्हटले आहे.
ममतांनी सेन यांना पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला आहे. त्याबद्दल सेन यांनी ममतांचे आभार मानले आहेत.