कोलकाता – भारतीय जनता पक्षात धमक असेल तर मला अटक करून दाखवावीच, असे आव्हान देतानाच ( mamta banerjee challenges bjp ) मी कारागृहात असले तेथून निवडणूक लढवेन आणि तृणमूल कॉंग्रेस विजयी होईल, असा विश्वास प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( cm mamta banerjee ) यांनी व्यक्त केला.
294 सदस्यांच्या विधानसभेसाठी एप्रिल-मे महिन्यात प. बंगालमध्ये निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी भारतीय जनता ( BJP ) पक्षावर जोरदार टीका केली. हा पक्ष म्हणजे असत्याची कचराकुंडी आहे. हा पक्ष म्हणजे देशाला लागलेला सर्वात मोठा शाप आहे, असे त्या म्हणाल्या.
तृणमूलच्या आमदारांना लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष ( BJP ) करत आहे. काही जण कुंपणावर असल्यासारखे वागत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल, असे वाटत आहेत, असे आरोपही त्यांनी केले. निवडणुका आल्या की तृणमूल कॉग्रेसच्या ( TMC ) नेत्यांच्या नावाने स्टिंग ऑपरेशन आणि घोटाळ्यांचे आरोपसत्र सुरू करतात. हा काही राजकीय पक्ष नाही. तर ही एक खोटारडेपणाची कचराकुंडी आहे, असे त्या म्हणाल्या.
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना कारागृहात टाकले तरी त्यांच्या पक्षाने उत्तम कामगिरी केली. भाजपाचा ( BJP ) विजय हा हातचलाखीचा आहे. तो लोकप्रियतेचा नाही, असे त्यांनी सांगितले. कुंपणावर बसलेल्यांना मी सांगू इच्छिते की भाजपाला बहुमत मिळणार नाही. कोणत्याही स्थीतीत चुकून माकूनही मिळणार नाही. आपणच यावेळी गेल्या वेळेपेक्षा अधिक बहुमताने विजय मिळवू, असे त्या म्हणाल्या.