कोलकाता – पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने शहरांमधील फुलांचे मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या सरकारने हा निर्णय घेतला असला तरी राज्यातील भाजप नेत्यांनी मात्र त्यावर टीका केली आहे.
भाजपचे नेते बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे की ममतांनी हा निर्णय घेऊन चुकीचा संदेश दिला आहे. हावडा येथील फूल मार्केट सुरू करून ममतांनी तेथील नागरिकांचे जीव धोक्यात घातले आहेत. त्यांनी मिठाई, पान आणि सुपारीची दुकानेही उघडी ठेवण्याची अनुमती दिली आहे. अशा निर्णयांमुळे आपण करोनाचा पराभव कसा करू शकणार असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यातील करोना आता संपला आहे असाच अविर्भाव यातून दिसतो आहे त्याचा जनतेलाच मोठा फटका बसणार आहे असे सुप्रियो यांनी म्हटले आहे. लोकांनी या निर्णयाचा विरोध करून घरातच थांबावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.