मुंबई – केंद्रातील मोदी सरकारबाबत सामान्य लोकांमध्ये मोठा रोष आहे. मागील सात वर्षात वाढती महागाई, बेरोजगारी, कोरोना परिस्थिती हाताळण्याची पद्धत, लसीकरणाच्या मोठ्या गप्पा बघून जनता बेजार आहे. त्यामुळे याबाबत एक पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे.
केंद्रातील मोदी सरकारबाबत सामान्य लोकांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळे याबाबत एक पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. प. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत आहेत – ना. @nawabmalikncp@PawarSpeaks@MamataOfficial pic.twitter.com/MDEpabXMGU
— NCP (@NCPspeaks) July 29, 2021
यासाठी प. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत आहेत. लोक परिवर्तन करु इच्छित आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर एक पर्याय देण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी एक प्राथमिक चर्चा सुरु कली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.