कोलकाता – दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संवाद साधला. त्यांच्या आंदोलनाला तृणमूल कॉंग्रेसचा पूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.
प. बंगालमधील सत्ताधारी असणाऱ्या तृणमूलचे पाच सदस्यीय पथक सध्या शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. सोमवारी या शेतकऱ्यांनी संपूर्ण दिवसभर अन्नत्याग आंदोलन केले. आमच्या सर्वेसर्वा ममतादिदी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा केली.
त्यावेळी काही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी धरण स्थळाला भेट देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी आपल्या आंदोलनाला तृणमूल कॉंग्रेसचा पूर्ण पाठींबा असल्याचे तृणमूलच्या नेत्याने सांगितले.